उंबरठा शास्त्र

हजारो वर्षांपूर्वीचे शास्त्र – घराच्या मुख्य दरवाज्यासाठी लाकडी उंबरठा

सद्य परिस्थितीत (काळातील) उपलब्ध जागा आणि गरज, बांधकामाचे नियम, इंच इंच जागेचा वापर करण्याची व्यासायिक जोड. वास्तूशास्त्राबाबत असलेले गैरसमज आणि अनास्था यामुळे आत्ताच्या बांधकाम ( इमारत, भवन) पद्धतीत वास्तूशास्त्र ? हा मोठा प्रश्नच आहे. शास्त्राचे ज्ञान झाल्यावर त्यानुसार वास्तूमध्ये तोडफोड करून बदल हे सुध्दा बांधकामातील नियमांमुळे बऱ्याच वेळेला इच्छा असूनही शक्य होतेच असे नाही. त्यामुळे येणाऱ्या अडचणी याचे उत्तरही अवघड होऊन बसते.

तथापि आपले ऋषीमुनी, ग्रंथकर्ते हे द्रष्टे होते. काळाच्या पलिकडे त्यांचे ज्ञान होते. काळ, परिस्थितीनुसार वास्तुशास्त्र नियमाने परिपूर्ण तर असोच पण त्या जवळपासही नियमांचा विचार करून भवन, इमारत, घर या वास्तू निर्माण करणं बांधणं सहज शक्य होणार नाही हे त्यांनी जाणले होते.

सर्वसामान्य माणसाचा जीवन संघर्ष कमी होऊन त्याला कुटुंबासह गुणात्मक उत्कर्ष होऊन भौतिक जीवनात सुख, सांपत्तिक लाभ, निरोगी शरीर, व्यक्तिनिहाय अध्यात्मिक प्रगती याचा लाभ होण्यासाठी सखोल व्यापक आणि विस्तृत शास्त्राबरोबरच अगदी साधे, सोपे, सहज असे वास्तूनियम (शास्त्र) अनेक ऋषीमुनींनी ग्रंथाद्वारे मानवी कल्याणासाठी दिले.

पाच तत्व आणि सूर्यप्रकाशाची अतिनील किरणं ( Altra Violate Rays) प्रखर, तीव्र, ताम्र किरणं ( Infra Red Rays) यांचा आठ दिशा क्रमाने पृथ्वीवरील वातावरणात होणारा परिणाम, वास्तूवर अतिसूक्ष्म पर्यंत होणारे फायदे आणि दुष्परिणाम अर्थातच अंतिम परिणाम मनुष्य, प्राणी आणि निसर्ग यावरती होणारा थेट दुष्परिणाम कमी करण्यासाठी अथवा टाळण्यासाठी विज्ञाननिष्ठ वास्तुनियम (शास्त्र) आखून दिले.

यातील एक भाग म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराचे महत्व लक्षात घेऊन त्या विषयी अगदी साधे, सोपे, सहज नियम दिले आहेत.

उंबरठ्यासाठी वापरले जाणारे लाकडाचे प्रकार.
सागवान

सागवान लाकूड टिकाऊ आणि मजबूत असून, या झाडावर कोणतेही पशुपक्षी आणि कीटक अन्नासाठी अवलंबून नसतात.

शिसव किंवा शिसम

लाकडाच्या उपलब्धतेनुसार तसा वापर केला जातो.

देवदार

हा प्रत्येक विभागानुसार वापर केला जातो.

खैर

दक्षिण आग्नेय दरवाजा असेल, तर खैराचे लाकूड वापरले जाते, असे म्हणतात.

फणस

दक्षिण भारत आणि कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

उंबरठा तयार करतानाचे व तयार झाल्यानंतरचे व्हिडिओ :

उंबरठा फिटिंगचे फोटो

॥ ॐ गं गणपतये नमः ।।
॥ श्रीं ॥
।। श्री भूवराहस्वामी नरसिंह लक्ष्मी देवता प्रसन्न।।
॥ श्री राजराजेश्वरी ललिता महात्रिपुरासुंदरी देवता प्रसन्न ॥

वास्तुशास्त्रातील उंबरठ्याचे महत्व अर्थातच 'सीमारेषा'

सद्य परिस्थितीत (काळातील) उपलब्ध जागा आणि गरज, बांधकामाचे नियम, इंच इंच जागेचा वापर करण्याची व्यासायिक जोड. वास्तूशास्त्राबाबत असलेले गैरसमज आणि अनास्था यामुळे आत्ताच्या बांधकाम ( इमारत, भवन) पद्धतीत वास्तूशास्त्र ? हा मोठा प्रश्नच आहे. शास्त्राचे ज्ञान झाल्यावर त्यानुसार वास्तूमध्ये तोडफोड करून बदल हे सुध्दा बांधकामातील नियमांमुळे बऱ्याच वेळेला इच्छा असूनही शक्य होतेच असे नाही. त्यामुळे येणाऱ्या अडचणी याचे उत्तरही अवघड होऊन बसते.

तथापि आपले ऋषीमुनी, ग्रंथकर्ते हे द्रष्टे होते. काळाच्या पलिकडे त्यांचे ज्ञान होते. काळ, परिस्थितीनुसार वास्तुशास्त्र नियमाने परिपूर्ण तर असोच पण त्या जवळपासही नियमांचा विचार करून भवन, इमारत, घर या वास्तू निर्माण करणं बांधणं सहज शक्य होणार नाही हे त्यांनी जाणले होते.

सर्वसामान्य माणसाचा जीवन संघर्ष कमी होऊन त्याला कुटुंबासह गुणात्मक उत्कर्ष होऊन भौतिक जीवनात सुख, सांपत्तिक लाभ, निरोगी शरीर, व्यक्तिनिहाय अध्यात्मिक प्रगती याचा लाभ होण्यासाठी सखोल व्यापक आणि विस्तृत शास्त्राबरोबरच अगदी साधे, सोपे, सहज असे वास्तूनियम (शास्त्र) अनेक ऋषीमुनींनी ग्रंथाद्वारे मानवी कल्याणासाठी दिले.

पाच तत्व आणि सूर्यप्रकाशाची अतिनील किरणं ( Altra Violate Rays) प्रखर, तीव्र, ताम्र किरणं ( Infra Red Rays) यांचा आठ दिशा क्रमाने पृथ्वीवरील वातावरणात होणारा परिणाम, वास्तूवर अतिसूक्ष्म पर्यंत होणारे फायदे आणि दुष्परिणाम अर्थातच अंतिम परिणाम मनुष्य, प्राणी आणि निसर्ग यावरती होणारा थेट दुष्परिणाम कमी करण्यासाठी अथवा टाळण्यासाठी विज्ञाननिष्ठ वास्तुनियम (शास्त्र) आखून दिले.

यातील एक भाग म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराचे महत्व लक्षात घेऊन त्या विषयी अगदी साधे, सोपे, सहज नियम दिले आहेत.

  • घराचा मुख्य दरवाजा उपदिशेत म्हणजेच कोपऱ्यात नसावा.
  • प्रदक्षिणा मार्गाने (Clockwise) गृहप्रवेश असावा.
  • मुख्य दाराच्या एका सरळ रेषेत सर्व दरवाजे नकोत.
  • मुख्य प्रवेशद्वार दोन कवाडांचे (पटल) असावे. त्यात उजवे पटल (कवाड) डाव्या पटलापेक्षा लहान असावे.
  • दरवाजा समोर अडथळे म्हणजेच झाड, खांब, इतर (द्वार वेध) नसावे. तुळई खाली (बीम) दरवाजा नसावा.

सर्वात महत्वाचे सिंहद्धाराला चौकट असावी. चौकट म्हणजेच उंबरठा असावा. परंतु आताच्या (Flat System) मधून उंबरठा गायबच झाला आहे. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्रा प्रमाणे असेल तरी अनेक चांगले परिणाम मिळतात. दरवाजा म्हणजे घराचे मुख अर्थात तोंड हे तोंडच जर अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, चुकीच्या पदात म्हणजेच शास्त्रानुसार नसेल, नकारात्मक उर्जांनी भरलेले असेल तर आत जाणाऱ्या अन्नाचे काय होईल? हे आपण समजू शकताच.

आजकालच्या फ्लॅट पद्धतीमुळे वरील नियमानुसार मुख्य दरवाजा (सिंहद्वार) मिळणे अशक्यच आहे. त्यामुळे दरवाजाशी संबंधित अनेक दोष असू शकतात. मग यावर उपाय काय ?
दरवाजाला निदान ‘चौकट’ हवी. आजकाल चौकट नक्कीच नसते!!! आश्चर्य वाटलं ना हो 5 आजकाल चौकट नसतेच. कारण आपण ज्याला उंबरठा म्हणतो तो उंबरठा नसतोच. उंबरठा नसल्यास त्याला चौकट म्हणता येईल का ? उत्तर नाही. खरे तर ती ‘त्रिकट’ होते, तीन ही संख्या या ठिकाणी अशुभ निदर्शक ठरते. उंबरठा हे मर्यादांचे प्रतिक आहे. घराचे घरपण जपण्यासाठी अनेक मर्यादांचे पालन हे करावेच लागते. वास्तू बाबत हा उंबरठा घरातील भावना घरातच ठेऊन बाहेरील व्यवहार बाहेर ठेवते. यालाच मर्यादा म्हणतात.

म्हणजेच उंबरठा एक ‘लक्ष्मण रेषाच’ होय. याचे सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक महत्व नियम आम्हाला कधीच लक्षात येत नाहीत. एक अलिखित कौटुंबिक, सामाजिक बंधन मुख्य दरवाजाचा उंबरठा म्हणजे वास्तुची सीमा रेषा म्हणजेच दिग्बंधन. नववधु सासरच्या वास्तुमध्ये ‘प्रथम प्रवेश’ करताना याच उंबरठ्यावरील धान्याने भरलेले माप उजव्या पायाने आतल्या बाजुला लवंडून त्या घराच्या लक्ष्मी रुपात प्रवेश करते. उंबरठ्या बाहेर पाऊल ठेवलेस तर बघ, उंबऱ्यावर बसू नकोस ही ….. अलिखित सामाजिक बंधनं, नियम पूर्वपार चालत आलेली आहेत.

यज्ञशास्त्रातही उंबरठ्याचे (चौकट) महत्व सर्वोच्च मानले आहे. प्राचीन काळापासून आपल्या देशात यज्ञ यागाची परंपरा आहे. या यज्ञ कार्यासाठी स्वतंत्र यज्ञमंडप उभारण्याचे वर्णन ‘यज्ञ कुण्डमण्डप सिद्धी’ या पुस्तकात आहे. यज्ञशाळा (मंडप ) उभारताना चारही दिशांना चौकटीसह (उंबरठा) द्विपटलांची द्वारे असावीत. प्रवेशद्वार म्हणून पश्चिमद्वाराचा वापर
असावा.

यज्ञमंडपाच्या चारही द्वारांना तोरण लावावे. पूर्व दिशेला वड, पिंपळ, दक्षिणेला औदुंबर, पश्चिम दिशेला पिंपळ, उत्तरेला पिंपळ याचा वापर करावा. या शिवाय सुवासिक फुले, आंब्याची पाने याचे तोरण म्हणून वापर केल्यास अधिक शुभ कल्याणकारी असते.

उंबरठा म्हणजे वास्तुची सीमारेषा, मर्यादा या दृष्टीकोनातून पाहिले असता त्याचे वैज्ञानिक महत्व सुध्दा आहे हे लक्षात येते.

उदा. जसे प्रत्येक खेळाला सीमारेषा ही आहेच, इतकेच काय पण क्रमाने सहज विचार केला तरी लक्षात येतेच. घर, वाडा (आता इमारत), मोहल्ला (गल्ली), पेठ, वाडी, गाव, तालुका, जिल्हा,
राज्य, राष्ट्र (देश) यांनाही सीमारेषा आहेतच. त्यातूनच त्यांची ओळख तयार होते.

अगदी बारकाईने लक्षात घेता सर्व ग्रह, तारे हे त्यांच्या भ्रमण कक्षेतच भ्रमण करत असतात. पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांना सुध्दा सीमारेषाही ( भ्रमणकक्षा) आहेच. कृत्रिम उपग्रहाने भ्रमण कक्षा ओलांडली तर अपघात, नुकसान हे आहेच.

वैद्यकीय शास्त्राने सुध्दा डीएनए स्ट्रक्चरचा विषय अतिशय बारकाईने अभ्यासला आहे. डीएनए स्ट्रक्चरसुध्दा आपली सीमारेषा (एक ऑरबिट) ओलांडून त्याचे गुणसूत्र काम करत नाहीत. अर्थात यापेक्षाही हा विषय सखोल आहे. पण केवळ सीमारेषेचा विचार करून इथे विचारात घेतलेला आहे. याच बरोबर भौतिकशास्त्रामध्ये अणुरेणूंची संरचना सुध्दा तिचे कार्य करत असताना तिच्या मर्यादित कक्षेतच अणुरेणू फिरत असल्याचे (ऑरबिट) सिद्ध झाले आहे. एवढं महत्व सीमारेषेला आहे.

जर्मन आणि अमेरिकेत सुध्दा या विषयावरती संशोधन चालू आहे. तिथे बाऊ बायोलॉजी नावाचं शास्त्र प्रचलित असून या शास्त्रानुसार उंबरठ्याच्या बाहेरचा भाग सौर उर्जेचं, आतील भाग चांद्रउर्जेचं आणि मधला भाग पृथ्वी उर्जेचं संतुलन राखतो असं निरिक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे. (www.bau biology.com)

या वरूनच भारतीय वास्तुशास्त्रातील उंबरठा विषयाचे वैज्ञानिक, सामाजिक, धार्मिक महात्म्य स्पष्ट होते.

धर्मशास्त्रात आलेल्या वर्णनानुसार उंबरठ्यावर श्री नरसिंहलक्ष्मी देवतेचे स्थान मानले आहे. तर चौकटीच्या वरती विघ्नहर्ता श्रीगणेशाचे स्थान आहे. नरसिंह जयंती दिवशीची पूजा महाराष्ट्रातही सर्वज्ञात आहेच.

सिंह राशीतून कन्या राशीमध्ये सूर्याचे (रवीचे) संक्रमण होत असताना घरातील स्त्रीने घराच्या उत्कर्षासाठी, आर्थिक स्थैर्यासाठी आणि अध्यात्मिक प्रगतीसाठी उंबरठ्यावर रांगोळी काढून फुलं वाहून तुपाचा दिवा लावून पूजा करावी. शक्य झाल्यास इतर वेळेस दर बुधवारी याच पद्धतीने पूजा करावी अथवा कमीत कमी तुपाचा दिवा लावावा. रोज विविध प्रकारची रांगोळी उंबरठ्यावर काढावी अशी माहिती श्री क्षेत्र कुक्केश्री सुब्रह्मण्यम येथील श्री नरसिंह लक्ष्मी मठातील प्रमुख मठाधिपतींनी दिली.

दक्षिण भारतामध्ये प्रत्येक घरासमोर सडा मार्जन, रांगोळी, उंबरठ्याची पूजा नित्यनियमाने केली जाते. मग ते एका खोलीचे घर असो अथवा बंगला असो. व्यवसायाच्या जागेतही पुरुष उंबरठ्याची पूजा करतोच. त्याला हळद आणि कुंकवाचे लेपन केलं जातं. विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. दुकानाला उंबरा नसल्यास कमीत कमी तिथं कापूर, आणि उदबत्ती लावली जातेच.

काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक देवळाला उंबरठा हा आहेच. देवळाचा उंबरठा हा दगडी असतो. पण यामध्येही त्या त्या प्रभागानुसार बर्हिगर्भ, अंतर्गर्भ आणि गर्भगृह बाबत उंबरठ्याबाबातचे नियम वेगळे वेगळे आहेत. देवळातील सभागृहाला सुध्दा उंबरठा आहेच.

त्याच प्रमाणे अतिशय छोट्या खेडेगावातही पूर्वपार मुख्य दरवाजा चौकटीसह (उंबरठा) आहे. संपूर्ण घरातील वास्तुदोष घालवण्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च करण्या आधी दरवाजा योग्य ठिकाणी आणून, उंबरठा नसल्यास बसवून किंवा त्यावर शास्त्रानुसार शुभचिन्हे, मांगलिक चिन्हांचा वापर करून भाग्योदय होऊ शकतो. असे करून घेणे सोयीचे आणि सोपे तर आहेच. शिवाय कमी श्रमाचे, कमी खर्चाचेही आहे. दरवाजा बदलणे शक्य नसल्यास कमीत कमी मुख्य दरवाजाला लाकडीच उंबरठा असावा. काष्ठतत्व, सत्वगुण, सुप्तरूपात अग्नी असे लाकडाविषयी वर्णन आहे.

कामानिमित्त गेली अनेक वर्षे दक्षिण भारतात वारंवार जात असतो. त्या प्रभागात प्रवास करत असताना अगदी वाडी वस्ती वरील घरांना सुध्दा उंबरठा आणि त्याची पूजा दिसायची. नकळत वास्तूला लाकडीच उंबरठा बसवण्याचे आलेल्या लोकांना सांगण्यास सुरुवात केली. पहिल्या आठ ते दहा घरांना उंबरठा बसवल्या नंतर मिळालेले परिणाम खरोखरच विचार करण्यास भाग
पाडणारे होते. याच प्रेरणेतून काम सुरू झाले.

या बाबत वेळोवेळी संशोधन करून विशिष्ट आकाराचा (गोलाकार / अँगल ) सागवानी लाकडाचा उंबरठा आम्ही तयार केला आहे. हा उंबरठा मुख्य दरवाजाच्या चौकटीत, (आत्ताची त्रिकट) नेमक्या मापामध्ये / जागेत बसवावा लागतो. त्याला विशिष्ट प्रकाराची व विशिष्ट आकाराची उपरत्ने व काही रत्ने बसवली आहेत. ही बसवण्यासाठी त्या उंबरठ्याच्या खालील बाजुला विशिष्ट अंतरावरच बसवली जातात. आज पर्यंत गेल्या दोन वर्षांत ४०० घरांना वरील प्रमाणे लाकडी उंबरठे बसवले आहेत त्या घरातील होणारे बदल किती शुभफलदायी आहेत ते त्या कुटुंबासह आम्हीही अनुभवले आहेत. उंबरठा हा दोषयुक्त दरवाजाचे दोष कमी करण्यास मदत करणारा, शुभ उर्जा आणणारा अर्थातच आपल्या आणि कुटुंबाच्या भाग्योदयाच्या दिशेने जाणारा एक साधे, सरळ, सोपे शास्त्र असल्याची प्रचिती आली.

मुख्य दरवाज्याचा उंबरठा आणि तोरण ही केवळ परंपरा नाही —
तर ती वास्तुशास्त्रातील वैज्ञानिक संकल्पना आहे,
फक्त उपाय किंवा अंधश्रद्धा नाही.